नायगाव- नरसी शहरात भाजपतर्फे जल्लोषात विजयोत्सव साजरा.

204

 

नायगाव/शेषेराव कंधारे

देशातील चार राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटनिस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यक्रत्याच्या उपस्थीत नायगाव व नरसी शहरात फटाके फोडुन जल्लोषात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

- Advertisement -

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे काल सकाळपासून सर्वांचे लक्ष लागले होते. जसजसे निकाल हाती येत होते तसे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊ लागला. दुपारपर्यंत उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यात भाजपने यश मिळवल्यानंतर सोशल मिडियावर जल्लोष सुरू झाला. दुपारी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटनिस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली नायगाव व नरसी चौकात पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले तेथे विजयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

चार राज्यात जनतेने दिलेला भरघोस कौल हा नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जनतेसाठी केलेल्या कार्याची पावती असल्याचे मत याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शंकर कल्याण,मोहन पा. भिलवंडे,मारोती पा. भिलवंडे,गजानन पा. भिलवंडे, व्यंकटराव कोकणे,अलीम पटेल,गंगाधर वडगावे, साईनाथ अक्कमवाड,फारूक पटेल,हणमंत मिसे,हणमंत बट्टेवाड,मारोती बुक्के, बालाजी शेळगांवकर,हणमंत बट्टेवाड, बालाजी नरसीकर,त्र्यबंक डाके,सयाद इसमयला,राजू वडगावे, किशन खनपट्टे, संतोष बोधने,माधव वडजे, राम खनपट्टे, मधेवाड,शिवा मेटकर,विनोद पा. भिलवंडे,दिगंबर पा. भिलवंडे, संदीप जाधव,किशोर जानुरे, प्रदीप जोशी, रमेश वासरे,चंदू कोकणे,श्याम बोधने , सोमेश शेटकर,शंकर गगलेगावे सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.