नायगाव/शेषेराव कंधारे
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा “या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावा असे आवाहन नायगांव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी केले .
नरसी येथील जिवन विकास प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा ध्वज आपल्या घरावर पकडण्यासाठी मोफत वाटप केले . याप्रसंगी जेष्ठ पत्रकार गंगाधर भिलवंडे, प्रभारी मुख्याध्यापक नंदकीशोर नरसीकर,सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रामराव मावले आदींची प्रमुख उपस्थीती होती.
पुढे बोलताना संभाजी भिलवंडे म्हणाले की,स्वातंत्र्याच्या लढ्याची मुहूर्तमेढ महात्मा गांधीजींनी रोवली व त्यांच्यासह अगणित स्वातंत्र्य विरांनी आपल्या परीवाराची चिंता नकरता आपल्या घरावर पाणी सोडून आपल्या प्राणाची आहुती देवून स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला त्यात सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस,पंडीत जवाहरलाल नेहरू,भगतसिंग,चंद्रशेखर आजाद,लाला लजपततराॅय,सुखदेव मौलाना अब्दुल कलाम,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,विनोबा भावे,खान अब्दुल जब्बार खान,सरोजिनी नायडू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर याप्रमुख स्वातंत्र्यता सेनानीसह असंख्य स्वातंत्र्यवीरांनी जुलमी इंग्रजी राजवटी विरुद्ध लढून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून दिले . त्याला आज पंचाहत्तर वर्ष पुर्ण होत असून हे वर्ष आपण सर्व जन भारतीय स्वतंत्र्याचा “अमृत मोहत्सवी वर्ष ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करताना मला देशाचे पहिले पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ९३ वर्षापुर्वी ३१ डिसेंबर १९२९ रोजी पवित्र रावी नदी काठी पहील्यांदा भारतीय तिरंगा ध्वज फडकावून देशवासीयांना संबोधीत करताना म्हणाले की,आज तिरंगा फडकवला आहे आता हा कधीच कोणापुढे झुकणार नाही हार पत्कारणार नाही. म्हणून आज आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण तिरंग्याचे बहुमान राखून आपापल्या घरावर येत्या १३ ऑगस्ट ते १५ऑगस्ट पर्यंत तिरंगा फडकवयाच आहे व स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे असेही आवाहन केले.