अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे मूळ गाव मेंढा (जि. उस्मानाबाद) होते. त्यांचे वडील सिद्राम जावळे-पाटील हे सुरवातीला तुंगी (ता. औसा) आणि तेथून लातूरला स्थायिक झाले. वडील शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी काही वर्षे शेतकरी संघटनेचे कार्य केले होते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब जावळे विद्यार्थीदशेपासूनच आक्रमक होते. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते विविध समस्यांविरुद्ध चळवळी करू लागले. त्यांनी मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन स्थापन केले.
अश्या महान मानवाचा देह 5 फेब्रुवारी ला अनंतात विलीन झाला त्या निमित्त त्यांना विनम्र आदरांजली💐💐💐
शेषेराव प्रल्हादराव बेलकर
अखिल भारतीय छावा संघटना
नायगाव ता. उपाध्यक्ष