नायगावाच्या विकासाचा चेहरा अडीच वर्षात बदलणार- ना.अशोकराव चव्हाण

251

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे

विकास हाच केंद्रबिंदू ठेवून महाविकास आघाडी सरकार राज्यात काम करीत आहे.बिलोली-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीतील काँग्रेसचा विजय ही जनतेच्या विश्वासाची पावती आहे. नायगाव नगरपंचायत निवडणूकीत देखील काँग्रेस पक्ष प्रचंड बहुमताने विजयी होणार असून येत्या अडीच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून नायगावाचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
नायगांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२१ च्या प्रचारात दि.१७ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव येथील सभेत संबोधित करतांना ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
जालना ते नांदेड समृद्धी महामार्गमुळे जिल्ह्यातील नागरिकांना या मार्गवरील प्रवास अतिशय वेगवान व सुखकार होणार असून या माध्यमातून नांदेड ते थेट हैद्राबादला जोडण्यासाठी आगामी काळात आपण प्रयत्नशील आहोत. तसेच रस्ते वाहुतकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक स्वस्थ व वेगवान असल्याने नांदेड ते लातूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प मंजूर करण्याची गरज आहे. असे सांगत नायगाव सारख्या झपाट्याने विकास होणाऱ्या शहराचा मोहरा देखील येत्या अडीच वर्षाच्या काळात बदलून येथील नागरिकांना आवश्यक सोयीं सुविधा लाभ मिळवून देण्यास प्राधान्य देण्याचे अभिवचन ना.अशोकराव चव्हाण यांनी नायगाव वाशियाना दिले.
नायगाव नगरपंचायत प्रचार सभेला अध्यक्ष म्हणून मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर हे होते तर व्यासपीठावर मा.आ.वसंतराव पा. चव्हाण, पक्ष निरीक्षक मा.खा.तुकाराम रेंगे पाटील,आ.अमरनाथ राजूरकर,आ.जितेश अंतापूरकर,मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,महापौर जयश्रीताई पावडे,उद्योजक मारोतराव कवळे पाटील,नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,अब्दुल सत्तार,माजी उपमहापौर आनंद चव्हाण, विजय येवणेकर,संजय पा‌.शेळगावकर, सभापती संजय बेळगे, सय्यद रहीम सेठ,श्रीनिवास चव्हाण,संतोष पांडगळे,सेना अभिनेता अनिल मोरे,प्रा.रवींद्र चव्हाण,बाबासाहेब शिंदे,भाऊसाहेब भालेराव,ज्युनिअर जॉनी लिव्हर भालेराव, हणमंतराव चव्हाण,माणिक चव्हाण, सय्यद इसाक,दिलीप पांढरे,प्रा.शिवाजी पाटील,रावसाहेब मोरे सह बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकसह अन्य इच्छुक उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी खा.भास्करराव पा.खतगावकर , आ.अंतापूरकर , आ.अमरभाऊ राजुरकर, सभापती संजय अप्पा बेळगे , संभाजी पा भिलंवडे यांनी मतदारांना संबोधित करताना म्हटले की काॅग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पा.चव्हाण यांनी केले तर आभार दत्ता मामा येवते यांनी मानले

 

- Advertisement -

विरोधी पक्षाचे बि उगऊ देणार नाही – माजी आ.वसंतराव चव्हाण

नायगावच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत असो अथवा आताची नगरपंचायत असो विकास कामे झाले आहेत. मात्र फोडफोडीचे राजकारण किंवा विकास कामात अडथळा आणला नसून मागील नगरपंचायतीच्या निवडणूकीत थोडी चुक झाली.इतर पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले होते.मात्र या निवडणूकीत अगोदरच काँग्रेसचे तीन नगरसेवक बिनविरोध निघाले असून ११ ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणारचं असे ठामपणे सांगून आता विरोधी पक्षाचे मी नगरपंचायतीत बी देखील उगऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी केले

नायगावाचा विकास आता थांबणार नाही
माजी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण
…………………………………….
नायगाव तालुक्यातील प्रथम नगरपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामाचा आढावा माजी नगराध्यक्ष विजय चव्हाणांनी मांडला तसेच साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सह बौद्ध मंदिराचे काम मार्गी लावून संबंध जिल्ह्यातील नगरपंचायत पेक्षा अधिकचे घरकुलच कामे फक्त पाच वर्षात केले असून काही घरकुल मंजूर करण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्यामुळे ना.अशोकराव चव्हाण यांनी लक्ष द्यावे अशी मागणी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.